पूर्व आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील निमाती घाट येथे ब्रह्मपुत्रा नदीत 8 सप्टेंबर रोजी दुपारी दोन बोटी एकमेकांना भिडल्याची घटना घडली. एक बोट माजुळीहून निमाती घाटाकडे जात होती, तर दुसरी विरुद्ध दिशेने जात होती.
दोन्ही बोटींमध्ये सुमारे 50 लोक होते, त्यापैकी 40 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.
बोट दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी माजुली आणि जोरहाट जिल्हा प्रशासनांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) च्या मदतीने बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांनी मंत्री बिमल बोरा यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लवकरात लवकर माजुली येथे पोहोचण्यास सांगितले आहे. सरमा यांनी त्यांचे प्रधान सचिव समीर सिन्हा यांनाही घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएम सरमा यांच्याशी बोलून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
***